नवी दिल्ली – 2019 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार सुरवात झाली आहे. आता पर्यंत अनेक दिग्ज नेत्यांनी आणि खेळाडूंनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा सात राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये 979 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे-
-दिल्ली –19.55 टक्के
-बिहार – 20.70 टक्के
-हरियाणा – 23.26 टक्के
-झारखंड – 31.27 टक्के
-मध्यप्रदेश – 28.25 टक्के
-पश्चिम बंगाल – 38.26 टक्के
Lok Sabha Election 2019: Total 25.13% voting till 12 noon in #Phase6. West Bengal- 38.26, Delhi-19.55, Haryana- 23.26 Uttar Pradesh- 21.75, Bihar- 20.70, Jharkhand- 31.27, Madhya Pradesh- 28.25 pic.twitter.com/SOtZ8zbNjU
— ANI (@ANI) May 12, 2019