नवी दिल्ली : देशात लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता उद्ध्वस्त होईल, या विषयाकडे मानवतेच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला मुद्दा मांडला.
सरकार इस भयावह हालत की ज़िम्मेदार है। नागरिकों की ये दशा करना एक बहुत बड़ा अपराध है। आज संकट की घड़ी में हमारे भाइयों और बहनों को कम से कम सम्मान और सहारा तो मिलना ही चाहिए। सरकार जल्द से जल्द ठोस क़दम उठाए ताकि ये एक बड़ी त्रासदी ना बन जाए। pic.twitter.com/mM6ktVyQSS
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 28, 2020
राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब लोक उद्ध्वस्त होतील. त्यामुळे ज्या भारतावर आपण सगळे प्रेम करतो, त्यावर मोठा ठपका बसेल. भारतात दोनच गट नाहीत. त्यामुळे इथे निर्णय घेताना काळजीपूर्वक सखोल विचार करावा लागतो. या परिस्थितीशी लढण्यासाठी अधिक समावेशक विचार करण्याची गरज आहे.
काँग्रेस पक्षानेही आपल्या हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये भाजप सरकारवर टीका केली. कोणताही विचार किंवा नियोजन न करता देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. ज्या कामगारांना आता परत आपल्या गावाकडे जायचे आहे. ते सुद्धा यामुळे अडचणीत आले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.