पुणे – कोरोना विषाणूच्या भितीने शेतकऱ्यांनी बाजारात आपला माल विक्रीला आणणे थांबविले आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेही अव्वाच्या सव्वा दराने भाज्यांची विक्री करीत आहेत. मात्र, आता याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सध्या शहरासह, उपनगरात फळ आणि पालेभाज्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर गगणाला भिडले असल्याचे दिसून येत आहे. सध्या एका पालेभाज्यांच्या गड्डीचे दर तब्ब्ल ३० ते ५० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मात्र, अशा परिस्थिती सुद्धा आपल्याला भाजीपाला मिळणार की नाही, या भीती पोटी मिळेल त्या किंमतीत ग्राहक भाजीपाला खरेदी करत आहे.
दरम्यान, आता देशात पुढील तीन आठवडे म्हणजे २१ दिवस संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ही एका प्रकारची संचारबंदीच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (दि. २४) सांगितले.
कोरोनाला आपण पराभूत केले नाही तर आपण अनेक वर्ष मागे पडू, असा इशारा देत ते म्हणाले, हिंदुस्थानला वाचवण्यासाठी, आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे,या काळात आपल्या घराबाहेर पडण्यास पूर्ण मनाई आहे. त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण आहात तेथेच रहा. असं मोदी यावेळी म्हणाले.