बारामती – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन करण्यात आला आहे. सध्या काही साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातून आलेले ऊस तोड कामगार घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र राज्यातील आणि जिल्ह्यातील सीमा बंद असल्याने अनेक ऊस तोड कामगार बारामती तालुक्यात अडकून पडले आहेत.
दरम्यान, आता अडकून पडलेल्या ऊस तोड कामगारांवर उपासमारीची वेळ आहे. यामुळे प्रशासनाने एक तर आम्हाला जाण्यास परवानगी द्यावी किंवा आमची खाण्या पिण्याची सोय करावी अशी मागणी बारामतीतील झारगडवाडीत अडकून पडलेल्या कामगारांनी प्रशासनाने केली आहे.