लखनौ – उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाउन हटवण्यास सुरुवात केली असून 1 जूनपासून 600 पैकी कमी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौ, नोएडा, गाजियाबादसारखी मोठी शहरं असणारे जिल्हे जिथे ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त आहे तिथे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 600 पेक्षा कमी ऍक्टिव्ह रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी ते शुक्रवार बाजारपेठा सकाळी 7 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र वीकेण्ड कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वीकेण्डला शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा सॅनिटाइज करण्यात येतील.