पुणे(प्रतिनिधी) – लॉक डाऊनमध्ये भटके प्राणी आणि माणसे यांच्यामधील संघर्ष वाढला होता. अन्नावाचून जसे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल झाले तसचे रस्त्यावरील भटक्यांचेही हाल झाले. यामुळे आक्रमक झालेले भटके प्राणी रस्त्यावरुन जाणाऱ्यांवर हल्ले करण्याचे तसेच एकमेकांवरही हल्ले करण्याचे प्रमाण वाढले होते. या हल्ल्यांमुळे रेबीजसारखे आजार होण्याचा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन एका सामाजिक संस्थेने तब्बल भटक्या व बेवारस प्राण्यांचे रेबीजचे लसीकरण केले.
भारती तांबे यांच्या अॅनिलमल अॅडॉप्शन अॅण्ड रेस्क्यू पथकाचे सभासद व व डॉ. शिवशंकरानंद राऊत यांनी हे कार्य केले. त्यांनी श्वानांना मांजरांना रेबीज लसीकरण केले. कर्वेनगर व कोथरुड परिसरात ही मोहिम राबवली गेली.
लॉकडाउन च्या काळात व त्या नंतर वाढलेल्या मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष पाहून आम्ही हे पाऊल उचलले. हे रेबिजीन चे लसीकरण पुढील 3 वर्षांपर्यंत ह्या प्राण्यांना रेबीज आजारापसुन मुक्त ठेवेल अशी माहिती सुमित सुनिल तरटे यांनी दिली.
ह्या उपक्रमा मुळे कुत्रे व मांजरी चावण्याच्या धोक्यापासून माणसांना त्रास होणार नाही व प्राणी आणि माणसे यांच्यातील स्नेहभाव वाढीस लागेल. चार डॉक्टर्स व जवळपास वीस स्वयंसेवक यांचा जथा कामला लागून त्यांनी 316 व 26 मांजरे यांचे लसीकरण केले.