मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सर्वात पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळाली. यावेळी १४ एप्रिलनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली. राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच राज्यातील जनतेने आतापर्यंत धैर्य दाखवला आहे. देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवण्याचा आपल्या राज्याचा इतिहास आहे. जागतिक संकटातही आपल्याला हीच भूमिका पार पार पाडायची आहे.
१४ एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको, या संकटाचा सामना महाराष्ट्र ध्येर्याने करत आहे. या संकटात देशाला आणि जगाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राला करायचं आहे. हा लॉकडाऊन कधीपर्यंत काळेल हे जनतेच्या हातात आहे. आपणचं कोरोना संक्रमित साखळदंड तोडला तर लॉकडाऊन लवकरच संपेल.
राज्यातील आकाडा हा चिंताजनकरित्या वाढत आहे. कोरोनावरील नियंत्रण मिळवण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलत आहोत. रुग्ण आपल्यापर्ंत पोहचण्याची वाट न पाहता आपण रुग्णांपर्यंत पोहचत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. देशातील सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकजुटता दाखवली आहे. अशीच एकजुटता आपण कायम ठेवली तर कोरोनाचे युद्ध आपण सहज जिंकू असे ते म्हणाले. पंतप्रधान आपल्यासोबत आहेत.
राज्यातील जनतेने आतापर्यंत धैर्य दाखवले आहे. देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवण्याचा आपल्या राज्याचा इतिहास आहे. जागतिक संकटातही आपल्याला हीच भूमिका पार पार पाडायची आहे. काही ठिकाणी निर्बध आणखी कडक करावे लागतील. परिस्थिती नियंत्रणात असली तरी आपण गाफील राहता काम नये असे मुख्यमंत्री म्हणाले.