मुंबई : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतांनाच राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची शक्यता शक्यता आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. हा लॉकडाऊन करीती कालावधीसाठी वाढणार आहे हे मात्र स्पष्ट नाही. विशेष म्हणजे हा कालावधी शहरी भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे.
कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालल्याने १४ एप्रिल नंतर राज्यात लॉकडाऊन वाढू शकतो. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी १४ लॉकडाऊनचा कालावधी संपणार असल्याची घोषणा केली होती. राज्यात कोरोनाला थांबवण्यासाठी शासनाने ३० शासकीय रुग्णालये उपलध करून दिले आहेत. या रुग्णालयात केवळ कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येणार आहेत.
त्यासाठी सरकारने अधिसूचना काढली असून २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान काल राज्यात ६७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील ४३ रुग्ण मुंबई,१० मुंबई परिसरातील,पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्ण,वाशिम व रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० वर पोहचली आहे.