दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जो लॉकडाऊन जाहीर केला आहे तो काहीसा मोठा आहे, असे प्रख्यात राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. इतके दिवस लक्ष्मणरेषेच्या आत अख्खा देश राहिल्यानंतर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, असा इशाराही त्यांनी एका ट्विटर संदेशाद्वारे दिला आहे.
करोनाच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सरकारची वैद्यकीय तयारी अत्यंत तोकडी आहे, असेही त्यांनी नमूद केले असून त्यांनी म्हटले आहे की, सरकारने गरिबांच्या हितासाठी पुरेशी काळजी घेतलेली नाही. आपल्याला या 21 दिवसांच्या काळात आणि त्यानंतरही अत्यंत अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.