मुंबई : महाराष्ट्रात लोकडाऊन ३१मे पर्यंत वाढवले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३० हजाराच्या वर गेली आहे.
Government of Maharashtra extends lockdown till May 31 for containment of COVID19. pic.twitter.com/qjJOfEj6o0
— ANI (@ANI) May 17, 2020
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन टप्प्यात लागू केलेल्या लॉक डाउनच आज ५४ वा दिवस आहे. तिसऱ्या टप्प्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. लॉक डाउनच चौथा टप्पा उद्या म्हणजेच सोमवारपासून सुरु होणार आहे.
मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने जारी आदेशात 31 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थान कायदा 2005 आणि साथरोग नियंत्रण कायदा 1897 नुसार राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन अजॉय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची स्थिती वाढवणे गरजेचे असल्याचेही अजॉय मेहता यांनी या आदेशात म्हटले आहे. आधीच्या लॉकडाऊनमध्ये कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स आता 31 मे 2020 पर्यंत लागू राहणार आहेत.