नवी दिल्ली : देशात ३ मे पर्यंत केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय, बंद आहेत. या लॉकडाऊनमुळे कोरोनाबरोबरच देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला १७.५८ लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. असा अंदाज ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी बार्कलेज या कंपनीने व्यक्त केला आहे. तसेच २०२० मध्ये देशाचा जीडीपी कमी राहणार आहे. या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वृत्तीची गती शून्य राहील अशी शंका कंपनीने व्यक्त केली आहे.
तर, २०२०-२१ मध्ये देशाचा जीडीपी ०.८ टक्के असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा केली.
यावेळी बोलताना त्यांनी, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेले नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.