मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. त्यामुळे संचारबंदी पूर्णपणे उठेल, असं जनतेने गृहीत धरू नये, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात एकूण 120 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई आणि पुण्यात रुग्णांचं प्रमाण जास्त आहे.
दरम्यान, तेलंगाणा राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. 2 जूनपर्यंत आता तेलंगाणा संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.