श्रीनगर – काश्मीरातील ताबा रेषवरील सध्याच्या काही घडामोडींमुळे स्थानिक नागरीकांनी चिंता करण्याचे काही एक कारण नाही, ही काळजी घेण्यास लष्कर समर्थ आहे असे तेथील एक ज्येष्ठ लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी म्हटले आहे.
बारामुल्ला जिल्हतील बोनियार येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की छोट्या विपरित घटना त्या भागात होत असतात पण काश्मीरातील एकूण सुरक्षा स्थिती अत्यंत चांगली आहे. येथील स्थिती पुर्ण शांत राहील अशी प्रार्थना आपण करूया असेही त्यांनी म्हटले आहे.
काश्मीरात विघटनवाद्यांची गेम संपली आहे असेही त्यांनी नमूद केले. त्यांचा खरा चेहरा लोकांच्या लक्षात आला आहे असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान पांडे यांच्या हस्ते आज आर्मी गुडविल स्कुल मध्ये डिजीटल क्लास रूमचे उद्घाटन करण्यात आले. या भागातील 128 वर्ग शाळांचे डिजीटल क्लासरूम मध्ये रूपांतर केले जाणार आहे.