नवी दिल्ली – केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसले आहेत. शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या या आंदोलनाला २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसक वळण लागले.
हिंसेनंतर आंदोलनामध्ये सामील असलेल्या दोन संघटनांनी फारकत घेतली आहे. अशातच आता सिंघू बॉर्डरवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांविरोधातच आंदोलन सुरु करण्यात आलंय.
एका नामांकित वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील सिंघू बॉर्डरवर एका जमावाने शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर रिकामी करावी अशी मागणी करत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलकांनी आपण येथील स्थानिक असल्याचा दावा केला असून शेतकरी आंदोलनादरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय.
स्थानिक असल्याचा दावा करणारे हे आंदोलक सिंघू बॉर्डरवर जमले असून हातामध्ये तिरंगा घेत आंदोलक शेतकऱ्यांचा विरोध करतायेत. शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर लवकरात-लवकर रिकामी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
#WATCH | Delhi: Group of people claiming to be locals gather at Singhu border demanding that the area be vacated.
Farmers have been camping at the site as part of their protest against #FarmLaws. pic.twitter.com/7jCjY0ME9Z
— ANI (@ANI) January 28, 2021