नवी दिल्ली – मार्च अखेरच्या तिमाहीत केंद्र सरकारने घेतलेल्या कर्जाची रक्कम 84.68 लाखो कोटी रुपयांवर गेली आहे. त्या अगोदरच्या तिमाहीपेक्षा ही रक्कम दीड टक्क्यांनी जास्त आहे.
अगोदरच्या तिमाहीत सरकारचे कर्ज 83.40 लाख कोटी रुपये होते. या कर्जात बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाचा 40 टक्के तर विमा कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचा 24 टक्के इतका वाटा आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून कमी महसूल मिळाल्यामुळे सरकारला गेल्या वर्षी जास्त कर्ज घ्यावे लागले होते.