पिंपळे गुरव -सांगवी येथील शेवटच्या बस स्टॉपसमोरील मोकळ्या मैदानात पारवे, कबुतरे धान्य खायला मिळत असल्यामुळे जमतात. नागरिकही त्यांना खायला टाकतात. धान्यामुळे इतरही अनेक पक्षी येथे जमतात. मात्र, त्यांच्यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. तर नागरिकांनी कडक उपाययोजनेची मागणी केली आहे.
काही नागरिक पक्ष्यांना धान्य खाऊ घालतात. धान्य खाऊन झाले की पक्षी आजाबाजूच्या इमारती, गॅलरी, गच्ची, खिडक्यांमध्ये घाण करतात. त्यांची पिसेही इतरत्र पसरलेली दिसतात. पक्षांची घाण आणि पिसांमुळे दमा आणि फुफ्फुसाशी निगडीत इतर आजार होण्याची शक्यता असते. तसेच इतर अनेक आजारही उद्भवू शकतात, हे समोर आल्याचे नागरिकांनी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मोकळ्या मैदानातील जागेमध्ये पक्ष्यांना खायला टाकू नये, अशा सूचना डॉक्टरांनी दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी तसे फलकेही लावलेली आहेत. मात्र, याकडे काहीजण दुर्लक्ष करत त्यांना भरभरून खायला देतात. त्यामुळे नागरिकांना गंभीर आजारांना सामोरे जाण्याची भीती
व्यक्त होत आहे.
पारव यांमुळे व्सनाचे त्रास होतात तर काही नागरिकांना त्यांना धान्य देतात म्हणून ते जमतात महानगरपालिकेकडून कारवाई म्हणून फक्त आव्हान करू शकतो धान्य विभागाकडून टाका एकाच जागी नको पण त्यांच्यावर काही ठोस कारवाई करू शकत नाही महापालिकेच्या स्तरावर अशी उपाययोजना करणे अवघड आहे
– घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय.
अन्नधान्य खाऊ घातल्याने पुण्य लागते ही भावना मुळातच वेगळी आहे. या पक्षांसाठी विभागणी करून धान्य टाकण्याची योजना राबविणार आहोत.
– संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते
पारव्यांमुळे श्वसनाचे आजार पसरतात. त्यांना खाद्य देणे बंद केल्यास त्यांचा परिसरातील वावर कमी होईल.
– विनायक बडदे, पक्षी मित्र.