मुंबई- अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, आयोध्याच्या या निकालानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे…
१. राम मंदिरासाठी जे शहिद झाले त्या सर्वांसमोर मी नतमस्तक होतो.
२. या आंदोलनात सहभागी झालेले काही जन अजून देखील आमच्यासोबत आहेत त्या सर्वांना माझा मनाचा मुजरा.
३. या नव्या पर्वाचं आपण सर्वांनी चांगल्याप्रकारे स्वागत करूया.
४. येत्या २४ तारखेला मी पुन्हा अयोध्येला जाईन. तसेच तेथील परिस्थीचा आढावा घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
५. मी येत्या दोन दिवसात पुन्हा शिवनेरीला जाणारा आहे. त्या पवित्र मातीला, शिवरायांना वंदन करणार.
६. तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची पवित्र माती घेऊन गेलेलो. हि चमत्कार घडवणारी माती नेल्यानंतर मला विश्वास होता की ही माती चमत्कार घडवेल. आणि वर्षभराच्या आता हा निकाल लागला.
७. आज हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते.
८. आज ९ नोव्हेंबर आहे आणि गेल्या २४ नोंव्हेबरला मी अयोध्येत गेलो होतो.