पेठ – मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेठ परिसरातील बटाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. त्यामध्येच तापमान वाढल्याने ऐन फुलोऱ्यात आलेल्या बटाटा पिकाने माना टाकल्या होत्या. सध्या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने तापमान कमी झाले आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी सुखावला आहे.
मागील आठवड्यात कमालीचे तापमान वाढल्याने ऐन फुलोऱ्यात आलेले बटाटा पिकाने माना टाकल्या होत्या. ज्यांच्याकडे स्प्रिंकल उपलब्द होते. त्यांना पिकांना पाणी देणे शक्य झाले. इतके दिवस जपलेल्या पिकांचे नुकसान होताना शेतकरी हवालदील झाला होता. अशातच 30 व 31 ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.