नवी दिल्ली- चीनने लडाखमध्ये भारतीय भूमीत आक्रमण केल्याची बाब अनेक लडाखी नागरिक निदर्शनाला आणून देत आहेत. या देशभक्त लडाखी नागरिकांचा आवाज ऐकून त्यावर सरकारने भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा त्यांच्या या तक्रारीकडे केलेले दुर्लक्ष देशाला महागात पडू शकते, असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. गांधी यांनी त्यावर हे प्रतिपादन केले असून त्यात त्यांनी काही लडाखी नागरिकांच्या मुलाखतींचा व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात या नागरिकांनी चीनने लडाखमधील भारतीय भूमी हडपली असल्याची तक्रार केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की देशभक्त लडाखी नागीरक चिनी आक्रमणाच्या विरोधात आवाज उठवत आहेत. ते आरडाओरड करून सरकारला इशारा देत आहेत. त्यांच्या या आवाजाकडे दुर्लक्ष करणे देशाला महागात पडू शकते. देशहितासाठी त्यांचा आवाज ऐका असे कळकळीचे आवाहन त्यांनी मोदी सरकारला केले आहे.
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही असेच प्रतिपादन करताना म्हटले आहे की, असंख्य लडाखी नागीरक त्यांच्या मातृभूमी चीनने जमीन बळकावली असल्याच्या तक्रारी करीत आहेत. मोदी सरकारने या नागरिकांचे म्हणणे लक्षात घेऊन आपल्या मातृभूमीचे संरक्षण केले पाहिजे. त्यांनीही एका लडाखी नागूरिकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात या नागरीकाने चीनने भारतीय भूमीत आक्रमण केल्याच नमूद केले असून त्यात लडाखच्या हद्दीत गेले दोन महिने मोठ्याच ऍक्टिव्हीटी सुरू असल्याचे म्हटले आहे.