कपिल सिब्बल यांची मोदींना सुचना
नवी दिल्ली: नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था सध्या अत्यंत डळमळीत स्थितीत असल्याचे विधान केले आहे. कॉंग्रेस प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी त्या विधानाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधुन म्हटले आहे की मोदींनी आता फोटो सत्र थांबवून कामाला सुरूवात केली पाहिजे.
बॅनर्जी यांना काल नोबेल पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रीया दिली त्यात त्यांनी भारताच्या खालावत चाललेल्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती.
सध्या जी माहिती भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मिळत आहे ती पाहिल्यानंतर आता इतक्यात हीं व्यवस्था ठीक होण्याची कोणतेहीं लक्षण दिसत नाही अशी टिपण्णी त्यांनी केली होती.
पंतप्रधान मोदी हे बॅनर्जी यांची विधाने ऐकत आहेत काय? अशी विचारणा कॉंग्रेसचे प्रवक्ते सिब्बल यांनी केली. त्यामुळे मोदींना आता फोटोशुटचे प्रयत्न थांबवून अर्थकारण सुधारण्याच्या कामाला लागावे अशी सुचना त्यांनी मोदींना केली आहे.