लखनौ – उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे दलित आणि महिलांवर आत्याचार होत आहेत, त्याच प्रमाणे कॉंग्रेस शसित राजस्थानमध्येही दलित आणि महिलांवर आत्याचार होत आहेत.
ज्या प्रमाणे उत्तर प्रदेश ‘जंगल राज’ आहे, त्याचप्रमाणे राजस्थानही ‘जंगलराज’ आहे, अशी टीका बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे. गुन्हेगारीच्या घटना कमी करण्याऐवजी कॉंग्रेस नेते या घटनांबाबत मौन बाळगत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
‘उत्तर प्रदेशाप्रमाणेच कॉंग्रेस शासित राजस्थानमध्ये हरतऱ्हेचे गुन्हे घडत आहेत. विशेषतः निरपराध व्यक्तींच्या हत्या होत आहेत. दलित आणि महिलांवरील आत्याचारांचे प्रमण परमोच्च अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचले आहे.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तेथे कायद्याचे राज्यच अस्तित्वात नाही. तेथे केवळ ‘जंगलराज’ आहे. ही स्थिती अतिशय लज्जास्पद आणि चिंतेची बाब आहे.’ असे मायावती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या गुन्हेगारीच्या घटनांबद्दल सरकारला नियंत्रणात ठेवण्याऐवजी कॉंग्रेस नेते मौन बाळगत आहेत. या घटनांमधील पीडीतांची भेट घेणे केवळ मतांच्या राजकारणासाठी आहे, बाकी काहीही नाही. लोकांनी अशा नाटकांपासून सावध रहायला पाहिजे. हाच बसपाचा जनतेला सल्ला आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.