मुंबई – भारतीय जीवन महामंडळ म्हणजे एलआयसी विमा कंपनीचा आयपीओ मार्च 2022 पूर्वी उपलब्ध करण्यासाठी सरकारकडून गृहपाठ चालू आहे. या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी एलआयसीमधील अंशतः निर्गुंतवणूक केली जाणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये करोनाविषयक अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तरीही निर्गुंतवणूकीबाबत केंद्र सरकार ठाम आहे.
एअर इंडिया यशस्वी विक्रीमुळे सरकारचा आत्मविश्वास वाढला असून एलआयसीची निर्गुंतवणूक केल्यानंतर या विषयात सरकारला मोठे यश मिळणार असल्याचे समजले जाते. या घडामोडींकडे देशातीलच नाही तर जगातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या निर्गुंतवणूकीला एलआयसीतील बऱ्याच कर्मचाऱ्यांसह इतर सरकारी कंपन्यातील कर्मचाऱ्यानी विरोध केलेला आहे.