मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसी आपला सरलेल्या वर्षाचा ताळेबंद 30 मे रोजी जाहीर करणार आहे. ताळेबंदात एलआयसी किती लाभांश देते या बाबत गुंतवणूकदारांच्या मनात उत्सुकता असणे सहाजिक आहे.
एलआयसीने शेअर बाजाराला कळलेल्या माहितीनुसार एलआयसीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे रोजी होणार आहे. या बैठकीत सरलेल्या पूर्ण वर्षाचा आणि चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीत संचालक मंडळ सरलेल्या वर्षाच्या ताळेबंदावर विचार करून त्याला मंजुरी देणे अपेक्षित आहे.
एलआयसीची शेअर बाजारावर 17 मे रोजी नोंदणी झाली आहे. त्याअगोदर एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात उपलब्ध करण्यात आला होता. मात्र आयपीएलच्या आयपीओच्या किमतीपेक्षा एलआयसीच्या शेअरची किंमत सध्या कमी पातळीवर आहे. त्यामुळे एलआयसीच्या गुंतवणूकदारांना सोबत ठेवण्यासाठी एलआयसीला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील असे समजले जाते.
या बैठकीत संचालक मंडळ किती लाभांश द्यायचा याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुळात एलआयसीच्या आयपीएलच्या माध्यमातून किमान 60 हजार कोटी रुपये उभे करण्याचा सरदार सरकारचा संकल्प होता. मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर या आयपीओला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे केंद्र सरकारने या आयपीएलच्या माध्यमातून 60 हजार कोटी रुपयाऐवजी 20,500 कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले होते.
सरकारने ही रक्कम उभी केली आहे. मात्र या शेअरची शेअर बाजारावर नोंदणी झाल्यानंतर शेअरचा भाव आयपीओच्या भावापेक्षा कमी झाला आहे. आयपीओ मधील शेअरचा भाव 949 रुपये इतका होता. मात्र सध्या या शेअरचा भाव 826 रुपये प्रति शेअरदरम्यान आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना ताळेबंदावेळी मोठा लाभांश जाहीर केला जाण्याची शक्यता वाटते. मात्र ही बाब ताळेबंद जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
कंपनीने मागील वर्षीदेखील लाभांश दिला नव्हता. केंद्र सरकारला एलआयसीचे 25 टक्के शेअर विकायचे आहेत. आयपीओच्या माध्यमातून सरकारने फक्त 3.5 टक्के शेअर्स विक्री केली आहे. सरकार येत्या काळात एफपीओ देखील आणू शकते. एफपीओला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.