नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा महामंडळाने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये शेअर्सच्या विक्रीतून 37,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. शेअर्सच्या विक्रीतून इतका मोठा नफा झाल्याची एलआयसीच्या 65 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. वास्तविक, शेअर बाजारात गेल्या वर्षी विक्रमी तेजी दिसून आली, त्याचा फायदा एलआयसीलाही झाला.
आर्थिक वर्ष 2020 मध्ये एलआयसीला शेअर बाजाराकडून 25,625 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. आता त्यात अतिरिक्त 44.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशातील सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदाराने 94,000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. ही रक्कम आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर आहे.
इक्विटी पोर्टफोलिओमधून जास्तीत जास्त नफा मिळाला. एक गुंतवणूकदार म्हणून, एलआयसीने उपलब्ध संधींचा फायदा घेतला आणि दीर्घकाळ फायदा देणारा पोर्टफोलिओ निवडला. एलआयसीने नफा कमावण्यासाठी आणि बाजारात उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेत विविध क्षेत्रांमध्ये विक्री केली आहे.
पॉलिसीधारकांपासून सरकारपर्यंत या नफ्याचा होईल फायदा
आता एलआयसीच्या या विक्रमी नफ्याचा अर्थ असा आहे की कंपनी पॉलिसीधारकांना अधिक चांगले बोनस आणि परतावा देण्यास सक्षम असेल. त्याचबरोबर सरकारला चांगला लाभांशही देऊ शकेल. एलआयसी आपले अतिरिक्त निधी व्यवस्थापित करण्यास मदत करेल. एलआयसीची रणनीती उच्च गुणवत्तेची मालमत्ता संपादन आणि देखरेख करणे आहे. याशिवाय निवडक समभागात बदल करून एलआयसीलाही फायदा होतो.
एलआयसीने पायाभूत उद्योगांमधील आपली गुंतवणूक सर्वात कमी केली आहे. मार्च 2020 पर्यंत एलआयसीची पायाभूत सुविधा क्षेत्रातील एकूण गुंतवणूक सुमारे 24,000 कोटी रुपये होती. जी आता जवळपास 4,100 कोटी रुपयांवर आली आहे. गेल्या वर्षी मार्चपर्यंत एलआयसीने आयटी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात 55,000 कोटींची गुंतवणूक केली होती. आता ती 11,600 कोटींवर आली आहे.
गेल्या एक वर्षात फार्मा इंडस्ट्रीत तेजी आहे. एलआयसीने त्यात गुंतवणूक वाढवली आहे. गेल्या वर्षापर्यंत एलआयसीने फार्मा उद्योगात 17,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, परंतु आता ही रक्कम वाढून 37,000 कोटी रुपयांवर गेली आहे. एलआयसीने एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांमध्येही गुंतवणूक वाढवली आहे. मागील वर्षापर्यंत या क्षेत्रात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होती, ती आता वाढून 50,000 कोटी रुपये झाली आहे.