मुंबई – देशामध्ये करोना विषाणू संकटाने थैमान घातले आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. विषाणूची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले हे निर्बंध यशस्वी ठरत असले तरी यामुळे सामान्यांचे कंबरडे मात्र पुन्हा एकदा मोडले आहे. पहिल्या लाटेनंतर पुर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला दुसऱ्या लाटेचा रूपात मोठा ब्रेक लागला आहे.
एकीकडे रोजगार कमी होत असतानाच महागाई वाढत असल्याने जनतेपुढे मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. देशात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक ठिकाणी पेट्रोलचा प्रतिलिटर भाव १०० रुपयांपार पोहचला आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून सत्तेत नसताना इंधनाबाबतची त्यांच्या विधानांची आठवण करून दिली आहे.
अशातच काँग्रेस नेते भाई जगताप यांनी, अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि अक्षय कुमार यांना पत्र लिहीत तुम्ही इंधन दरवाढीविरोधात काहीच का बोलत नाही? असा जाब विचारला.
जगताप यांना पत्र लिहण्यामागचे कारण विचारले असता त्यांनी, ‘बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी काँग्रेस सत्तेत असताना पेट्रोल दरवाढीविरोधात व्यक्त झाले होते. मात्र आता ते काहीच बोलत नाहीत म्हणून मी त्यांना पत्र लिहून याबाबत विचारणा करत आहे.’ असं सांगितलं.
They’ve tweeted over rising fuel prices in the past, which was fair. But this time when the prices have crossed Rs 100, why are they quiet & not asking anything?: Mumbai Congress President Bhai Jagtap on why he wrote letter to actors Amitabh Bachchan, Anupam Kher & Akshay Kumar pic.twitter.com/bVsQ80zDBZ
— ANI (@ANI) June 3, 2021