मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच नवाब मलिक यांनी म्हटलं होत की, समीर वानखेडेंची नोकरी घालवल्याशिवाय राहणार नाही. यावर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सूचक विधान केलं.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. मंत्री आठवले म्हणाले, आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही. आरोप होतायत. मात्र संपूर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे.न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात NCB कडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही, असंही आठवले यांनी नमूद केलं.
दरम्यान एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाते की नवाब मलिकाचे मंत्रिपद जाते ते बघू या, असा सूचक इशारा केंद्रीय रामदास आठवले यांनी दिला आहे.