मुंबई – शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील कराची स्वीट्स या बेकरीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘कराची’ एक दिवस भारताचा भाग असेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अखंड भारत’वर आमचा विश्वास आहे. त्यामुळे कराचीच एक दिवस भारताचा भाग असेल, असा विश्वास आम्हाला आहे.
यावर बोलताना आधी पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा, कराचीच नंतर बघू, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
First, bring the Kashmir that is occupied by Pakistan. We will go to Karachi later: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/z15UjkAI5H pic.twitter.com/gfwMmr34hT
— ANI (@ANI) November 23, 2020
दरम्यान, मुंबईतील वांद्रे भागातील कराची स्वीट्सचे नाव बदलण्याची मागणी नितीन नांदगावकर यांनी नुकतीच केली होती. कराची हे शहर पाकिस्तानातील असल्यामुळे या शहराच्या नावाने भारतात दुकान असल्याने आपल्या जवानांचा अपमान होत, असल्याचे नांदगावकर यांनी म्हटले आहे.