नगर -दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून त्यावर मात करणे सहज शक्य आहे. अशा वेळी अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने हाती घेण्यात आलेला मिशन पॉझिटिव्ह सोच हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी केली आहे.
या उपक्रमात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी नगरकरांशी संवाद साधला. नोव्हेंबर महिन्यात करोनाची जगातील सगळ्यात पहिली केस चीनमध्ये सापडली होती. त्यानंतर भारतामधील करोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्यात आढळून आला होता. परंतु जानेवारीपासून ते 23 मार्चपर्यंतचा काळ हा देशात असाच सुरू होता. त्यानंतर आपल्याकडे लॉकडाऊन करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या संकटाचे गांभीर्य आपल्या लक्षातच आले नाही.
आज घरापर्यंत करोना येऊन पोहोचला आहे. शहर कॉंग्रेसच्यावतीने मिशन पॉझिटिव्ह सोच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कुठलही संकट आलं तर अशा वेळी आपण सकारात्मक राहिल पाहिजे, असेही तांबे म्हणाले. पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, समन्वयक किरण काळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे आणि युवक कॉंग्रेसच्या टीमने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.