Pahalgam Terror Attack | पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश देण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत.
गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमधून पाकिस्तानातील लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्याने या पाकिस्तानी नागरिकाची अडचण निर्माण झाली आहे. अशातच आता एका पाकिस्तानी व्यक्तीने आपल्या दोन मुलांच्या उपचारासाठी भारतात राहू देण्याची विनंती केली आहे.
भारतात आणखी काही वेळ राहू देण्याची परवानगी द्या…
सिंधमधील हैदराबाद येथील हे कुटुंब आहे. या दोन मुलांना हृदयविकार असून या उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ते भारतात आले आहेत. नवी दिल्लीत त्यांच्या मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. आपल्या दोन्ही मुलांची पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे भारतात आणखी काही वेळ राहू देण्याची परवानगी या मुलांच्या वडिलाने दोन्ही देशांकडे मागितली आहे. Pahalgam Terror Attack |
मुळचे पाकिस्तानी असलेल्या दोन मुलांच्या वडिलांनी काही मीडियाशी बोलताना सांगितले की, ‘आमची ९ आणि ७ वर्षांची मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. त्यांना हृदयविकार आहे आणि येथील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे त्यांच्यावर नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु पहलगाम घटनेनंतर ताबडतोब पाकिस्तानला परतण्यास सांगण्यात आले आहे. Pahalgam Terror Attack |
पुढे ते म्हणाले, ‘मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी माझ्या मुलांचे वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. कारण आम्ही आमच्या प्रवासावर, राहण्यासाठी आणि त्यांच्या उपचारांवर सुमारे १ कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी विनंती करण्यात आली आहे. Pahalgam Terror Attack |
हेही वाचा :