पौड – मुळशी तालुक्यात मंगळवार (दि. 3) रात्री पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळ मुळशी धरणातून बुधवारी (दि. 4) 25 हजार क्युसेकने मुळा नदीत विसर्ग सुरू होता. मात्र, बुधवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने गुरुवारी (दि. 5) हा विसर्ग थेट 15 हजार क्युसेकवर आणण्यात आला आहे.
या दमदार पावसामुळे ओढे-नालेही ओसंडून वाहू लागले आहेत. दरम्यान, पाणी सोडल्यामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याने नदी काठच्या शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यातही झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक थेट वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. त्यात आता पुन्हा नुकसान झाल्याने शासनाने या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर
धरीत आहे.