मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पावसाने होत्याच नव्हतं केलं आहे. कोकणात तर डोंगराने संपूर्ण गाव आपल्या कवेत घेतले. याच दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आता सरकार आणि विरोधी पक्ष घटनास्थळी पोहचत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली. यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे.. पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता.. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करा..@CMOMaharashtra pic.twitter.com/JNak2hT7RC
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 28, 2021
गोपीचंद पडळकर यांनी या सर्व दुर्घटनेचा आढावा घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले,’पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे.. पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता.. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करा.’