भुवनेश्वर – “मातृभाषा ही सर्वात महत्त्वाची आहे, कारण ती आईच्या गर्भातून येते. त्यामुळे आपण इतर कोणती भाषा शिकण्याआधी आपली मातृभाषा शिकण्यावर आणि त्याच्या प्रसारावर भर द्यायला हवा”, असे मत भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज भुवनेश्वरमध्ये व्यक्त केले. ओडिशामध्ये एका ओडिया भाषेतील दैनिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Vice Pres M Venkaiah Naidu at celebration of 100 yrs of publication of an Odia daily in Cuttack: Mother tongue is very important as it came from mother’s womb, bhasha aur bhawna ek sath chalte hain. Learn your mother tongue, promote it, & learn other languages too (06.10) #Odisha pic.twitter.com/xIDALv8IQc
— ANI (@ANI) October 6, 2019
हिंदी, बंगाली, इंग्रजी, तामिळ, तेलुगु, कन्नड किंवा फ्रेंच, चीनी कोणतीही भाषा शिकावी मात्र, त्याआधी आपल्या मातृभाषेचे संवर्धन करावे हे गरजेचे आहे. त्यासाठीच मी नेहमी प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत असावे, असे म्हणण्यावर भर देतो, असेही नायडू यावेळी म्हणाले.
Vice Pres Venkaiah Naidu: Learning Hindi,Bengali, English,Tamil,Telugu,Kannada or even French,Chinese,no problem, first promote your mother tongue, that’s what is required, that’s why I stress that govt schools/educational institutes must promote mother tongue upto primary level https://t.co/3ej2aKvc7a
— ANI (@ANI) October 6, 2019
दरम्यान, ‘एक राष्ट्र – एक भाषा’ असे म्हणणाऱ्या भाजपसाठी हा घरचा आहेर ठरला आहे. गेल्या महिन्यातच, हिंदीची सक्ती असावी या आशयाच्या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशातून टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांनी, आपण हिंदीची सक्ती असावी, असे बोललोच नव्हतो अशी सारवासारव केली होती. त्यावर आता नायडू यांनी देखील मातृभाषेचे महत्त्व सांगितले आहे.