मुंबई – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरलेल्या सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने विजय हजारे करंडक स्पर्धेत धावांची रास ओतली. अशी सुमार कामगिरीला कशी कलाटणी मिळाली याचा खुलासा केला आहे. संघाचे कर्णदारपद माझ्याकडे सोपवण्यात आल्यमुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली व त्यामुळे माझी कामगिरीही बहरली, असे शॉ याने सांगितले.
क्रिकेट खेळायला प्रारंभ केल्यापासून सर्वाधिक वेळा मी विविध संघांचे नेतृत्व केले आहे. 14, 16 व 19 वर्षांखालील मुंबई संघांचे मी यशस्वी नेतृत्व केले आहे. याशिवाय भारतीय अ संघाचेही कर्णधारपदही भूषविले आहे. हजारे स्पर्धेतही माझ्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले गेले. त्यामुळेच माझ्या वैयक्तीक कामगिरीवरही सकारात्मक परिणाम झाला. अत्यत जबाबदारीने नेतृत्व करताना वैयक्तिक कामगिरीही बहरली. भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर चुका सुधारून संघात पुनरागमन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही हे मला माहिती होते. कामगिरी करणे माझ्या हातात आहे हे देखील लक्षात आले.
ऑस्ट्रेलियात झालेल्या चुकांमुळेच मला संघातील स्थान गमवावे लागले. मायदेशात परतल्यावर मी माझ्या तंत्रावर मेहनत घेतली व त्याचा प्रयत्य हजारे स्पर्धेत आला. आता मला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फलंदाज म्हणून अपयशी ठरल्याने संघातून वगळण्यात आले. धावा होत नसल्याने आत्मविश्वास कमी झाला होता. मात्र, चुका सुधारून पुनरागमन करण्याची जिद्द कायम आहे, आसीेही तो म्हणाला.