Laxman Hake on Sharad Pawar । लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे हे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू न देण्यासाठी ओबीसी समाज आंदोलन करत आहे. ओबीसीच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आज ओबीसीने कधी महाराष्ट्रात दंगली घडवल्या आहेत का? उठाव केला आहे का? असा कोणता इतिहास आहे का? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी,” शरद पवारांनी आरक्षणासाठी सर्व पक्षीय नेत्यांची, आमदार, खासदार, सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक बोलवावी. तसेच एका खुळखुळा वाजवणाऱ्या माणसामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांना रोखले पाहिजे समजून सांगितलं पाहिजे”असे आवाहन देखील हाकेंनी शरद पवारांना केले आहे.
पुढे लक्ष्मण हाके याची शरद पवारांना उद्देशून, “शरद पवार पुरोगामी होते, उदारमतवादी होते. ते व्यक्त होत नाहीत याची खंत आहेत. ते प्रभावी व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक बोलवावी सर्वांना एकत्रित बसवावे, त्यांचा सर्व लोक आदर करतील, त्यांनी ही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येथील विरोधी पक्ष नेते येथील वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख येतील विधानसभा लोकप्रतिनिधी येतील.
ओबीसीने महाराष्ट्रात कधी दंगल केली का? Laxman Hake on Sharad Pawar ।
ओबीसीने या महाराष्ट्रात कधी दंगल केली आहे का? उठाव केला आहे का? अशी कोणता इतिहास आहे का? ओबीसी वंचित शोषित आहे. मराठा समाज शासनकर्ती जमात आहे, असे देखील लक्ष्मण हाके म्हणाले
झुंडशाहीने आरक्षणाची मागणी करणं घटनाविरोधी Laxman Hake on Sharad Pawar ।
झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं घटनाविरोधी आहे. जरांगेसाहेबांचे अलीकडे वक्तव्य पाहता ते काही बोलतील. एखाद्या कार्यक्रमात शेरोशायरी केली जाते त्याचा मतितार्थ अर्थ घ्यायचा असतो शब्दार्थ घ्यायचा नसतो. तो फक्त प्रेरणा देण्यासाठी असतो. भुजबळांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. महाराष्ट्रात लगेच दंगली होणार नाही. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे. शासन, प्रशासन काम करेल. उगाच शब्दश: अर्थ घ्यायचा आणि काही वक्तव्य करणे खूप खालची पातळीचे राजकारण आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.