मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर वकिलांनी संविधान वाचन करुन निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने पारित केलेल्या या कायद्याविरोधात दुपारी दोन वाजेच्या सुमारास पन्नासहून अधिक वकिलांनी न्यायालयाबाहेर गेट नंबर 6 वर निषेध आंदोलन केले.
यामध्ये ज्येष्ठ वकिल नवरोझ सिरवई, गायत्री सिंह, मिहिर देसाई आदींचा समावेश होता. उपस्थित वकिलांनी भारतीय संविधानचे एकत्रितपणे वाचन केले. भारतीय नागरिकांना कोणीही धर्माच्या आधारे विभक्त करु शकत नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
रिफ्युजी असलेल्या सहा धर्मातील नागरिकांना नागरिकत्व देण्यात येत आहे. मात्र यामध्ये मुस्लिम धर्माचा समावेश नाही, जे संविधानीकदृष्ट्या अयोग्य आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.