पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील न्यायालयातील कामकाज सुरू करत असताना न्यायालयातील बार रूम, कॅन्टीन आणि वकिलांचे चेंबर बंद ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एकीकडे हे सगळे बंद असताना गर्दी होऊ नये यासाठी वकिलांना न्यायालयाच्या पॅसेजमध्ये थांबण्यास देखील मनाई करण्यात आली होती. त्यामुळे पाउस सुरू झाल्यावर आम्ही थांबायचे कुठे? असा प्रश्न वकिलांना पडला होता. यावर उपाय म्हणून उच्च न्यायालयाने वकिलाना थांबण्यासाठी न्यायालयाच्या पॅसेजमध्ये व्यवस्था करण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाला दिला आहे. त्यामुळे पावसामुळे वकिलांची होणारी गैरसोय टळली आहे.
लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज 23 मार्चपासून बंद होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 8 जुनपासून न्यायालयाचे कामकाज सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये सुरू झाले. मात्र, कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता परत एकदा एका सत्रात करण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात ज्याप्रमाणे न्यायालयाचे कामकाज सुरू होते. तसेच, परत सुरू होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयातील बार रूम, सर्व कॅन्टीन, वकिलांचे चेंबर बंद ठेवण्याचा तसेच वकिलांना न्यायालयाच्या पोर्चमध्ये थांबण्यास देखील मनाई केली होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर कामकाजासाठी आलेल्या वकिलांपुढे थांबायचे कुठे असा सवाल होता?. मात्र उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत पुन्हा बदल केल्याने आणि फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार असल्याने न्यायालयात येणाऱ्या वकिलांची संख्या मर्यादित राहणार आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने या वकिलांच्या थाबण्याची सोया न्याल्याच्या पॅसेजमध्ये करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.