मुंबई- भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पीअन श्रेणीतल्या ‘वागीर’ पाणबुडीचे आज मुंबईत जलावतरण करण्यात आले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हे जलावतरण केले. या कार्यक्रमाला पश्चिम नौदलाचे प्रमुख वाईस एडमिरल आर. बी. पंडित, उपस्थित होते. ही पाणबुजी एक वर्षाच्या आत कार्यान्वित होईल, असे सांगितले.
भारतात बनलेल्या कलावरी-6 श्रेणीचा एक भाग आहे. फ्रान्सच्या नौदलाच्या सहाय्याने भारतीय नौदलाच्या प्रकल्प-75 अंतर्गत या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. या श्रेणीतल्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण 2017 साली केले होते. त्यापाठोपाठ खंदेरी, करंज आणि वेला या पाणबुड्याही जलावतरण करण्यात आले आहे. या श्रेणीच्या 6 पाणबुड्या नौदलामध्ये सहभागी होत आहेत. या श्रेणीच्या पाणबुडीद्वारे जमिनीवर आणि पाणबुडीविरोधी लढाऊ कारवाई देखील केली जाऊ शकणार अहे. याशिवाय शत्रूच्या गोपनीय हालचाली टिपणे, पाणसुरूंग पेरणे आणि टेहळणीसारख्या जबाबदाऱ्याही या पाणबुडीच्या माध्यमातून् केल्या जाऊ शकणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.