मुंबई ( latest marathi news ) – मनी लॉंड्रींग प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे निर्देश न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांनी दिले आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
सीबीआय पाठोपाठ आता ईडीकडून चौकशीची टांगती तलवार अनिल देशमुख यांच्यावर आहे. मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने हजर राहण्यासाठी दिलेला समन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जबाब नोंदवून घ्यावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. ( latest marathi news )
दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे. या सर्व समन्सना अनिल देशमुख गैरहजर राहीले. करोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रश्न विचारण्याची विनंती अनेक वेळा केली होती. देशमुख यांनी अर्जाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ईडीकडे कागदपत्रे किंवा विवरणपत्र सादर करण्याची परवानागी मागितली होती.
याचबरोबर अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने यावर 16 ऑगस्टला सुनावणी पार पडली होती. त्यावर ईडीच्या कारवाईपासून देशमुख यांना कोणताही दिलासा दिला नव्हता. ( latest marathi news )