दीपेश सुराणा/पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत किवळे गाव समाविष्ट होऊन 22 वर्ष उलटली आहेत. गावात पक्के रस्ते झाले. दवाखाना, शाळा आदी सुविधा आल्या. गावाचा ग्रामीण चेहरा बदलत गावाला शहरीकरणाचा नवा लूक मिळाला. मात्र, अद्यापही विविध सोयी-सुविधांचा अभाव असल्याचा ग्रामस्थांचा सूर आहे.
रस्ते झाले मात्र ते अरुंद. रस्त्यांची दुरूस्ती व्यवस्थित होत नसल्याने खड्डेमय रस्त्यांतून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. विकास आराखड्यात नियोजित असलेले काही रस्ते विकसित झाले. काही रस्त्यांचा विकास मात्र प्रलंबित आहे.पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळित आहे. विविध विकासकामांसाठी टाकलेल्या आरक्षणांचा अपेक्षित विकास झालेला नाही. क्रीडांगण, उद्यान, मोठा दवाखाना आदी सुविधा करण्याची नागरिकांची मागणी आहे.