नवी दिल्ली – या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 1.4 लाख सदनिकांच्या योजना जाहीर झाल्या. यातील केवळ 29 टक्के सदनिका किफायतशीर सदरात मोडतात, असे ऍनारॉक या संस्थेने म्हटले आहे.
सरकारने किफायतशीर घरांच्या किमतीची मर्यादा 45 लाख रुपयांवरून वाढविण्याची गरज आहे. तसे केले तर अशा घरांचा पुरवठा वाढू शकेल. निवडणुकांमुळे घरांची विक्री थंडावली होती. बऱ्याच सवलतींमुळे आगामी काळात घरांची विक्री वाढेल.