मुंबई पोलीस मध्ये झाली निवड
यवत : दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी गावातील शेतात मजुरी करणाऱ्या मजुराच्या मुलीने कष्टाच्या आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीचे मैदान गाजवत मुंबई पोलीस पदात निवड झाली.
मुंबई पोलीस शिपाई पदाचा निकाल (दि.१७)रोजी लागला. आणि नाथाचीवाडी गावात एकच जल्लोष झाला, कारण नाथाचीवाडी या छोट्याशा गावातील प्राणवी संजय झाडगे ह्या गरीब शेतकरी मजूर कुटुंबातील या मुलीने मुंबई पोलीस भरतीमध्ये बाजी मारत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.
प्रणवी हिचे संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.या यशामुळे तिचे वडील संजय निवृत्ती झाडगे आणि आई रानी संजय झाडगे यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.मुलीने कष्टाचे चीज केले असे आईवडील आणि सर्व ग्रामस्थही यांनी प्रभात शी बोलताना सांगितले.
प्रणवीची घरची परिस्थिती जेमतेम बेताचीच,आई आणि वडील गावातील शेतकऱ्यांच्या शेतात मोलमजुरीचे काम करतात.
प्रणवीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाथाचीवाडी येथे पूर्ण झाले, माध्यमिक शिक्षण माटोबा विद्यालय नाथाचीवाडी येथे आणि त्यानंतर विद्यालयीन शिक्षण भैरवनाथ विद्यालय खुटबाव येथे पूर्ण केले.प्रणवीने भोसले यांची ‘द परफेक्ट अकादमी’ माळेगाव(ता.बारामती) येथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले.सातत्य, अभ्यास,जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न याच्या जोरावर ह्या प्रणवीने यश संपादन केले.आई आणि वडिलांनी मुलगी पोलीस बनली पाहिजे याच्यासाठी तिला कशाची कमी पडू नाही दिली.
आईने -वडिलांनी काबाडकष्ट करत मुलांना घडविले.त्या कष्टाची जाण प्रणवीने सतत ठेवली त्यामुळे आज हे यश तिने संपादन केले आहे.गावातील इतर मुले व मुली पोलीस भरती साठी प्रयत्न करत आहेत.तसेच ह्याच परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र मुंबई पोलीस पदाला गवसणी घातली आहे.यामुळे सर्व ग्रामस्थांनी प्रणवी आणि तिचे आई – वडील यांचे अभिनंदन केले.तिच्यावर पंचक्रोशीतून आणि सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.