पेठ – करोनाचा धसका जसा शहरी नागरिकानी घेतला आहे, तसाच ग्रामीण भागातील नागरिकांनीही घेतला आहे. आंबेगाव तालुका कुरवंडी येथील गावकऱ्यांनी शहरी भागातील नागरिक आपल्या गावात येऊ नयेत यासाठी गावात येणाऱ्या रस्त्याचं बंद केला आहे.
गावकऱ्यांनी रस्त्यावर भलंमोठं एक झाडं आडवं टाकलं आहे. प्रवेश बंद, असा मजकूर त्यावर टाकला आहे. राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कलम 144 प्रमाणे जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरी देखील शहरी भागातील नागरिकांना करोनाचे गांभीर्य आहे की असाच प्रश्न आता निर्माण झाला .
ग्रामीण भागातील नागरिकांनी ही आता करोनाचा चांगलाच धसका घेतल्याचं यामधून दिसत आहे. आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील कुरवंडी या गावाने या गावाने गावाबाहेरील कोणताही नागरिक गावात येऊ नये यासाठी गावात येणारा रस्ताच अडवला असून रस्त्यावर भलमोठं झाड टाकून रस्ताच बंद केला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना ज्या पद्धतीने करोनाचे गांभीर्य आहे, तशाच पद्धतीने शहरातील नागरिकांनी ही कोरोनाबाबत सतर्क होऊन विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि स्वतःची काळजी स्वतः घेवून स्व:ताही सुरक्षित राहून इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असं मत सामाजिक कार्यकर्ते रमेश तोत्रे व गावकऱ्यांंनी व्यक्त केलं आहे.