नवी दिल्ली – हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला होता. या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाही स्नानानंतर तब्बल 102 साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यावेळी पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
दरम्यान, आता योजनेवरून भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता शूटर अभिनव बिंद्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. करोना विषाणू धर्मांमध्ये कोणताही भेदभाव करत नसल्याचं म्हणत अभिनव बिंद्रानं कुंभमेळ्याच्या आयोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू योगेश्वर दत्तने कुंभमेळ्याचं समर्थन करत एक ट्विट केलं आहे. मात्र, त्याच्या या ट्विटला सुद्धा अभिनव बिंद्राने चांगलंच फटकारलं आहे.
No one in the Kumbh Mela is reaching there illegally, people are following all protocols, no one is spitting at the security and medical staff, no one is running away after hiding from the administration.
Stop defaming the peaceful devotees at Kumbh. #ThankuTirathJi
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) April 14, 2021
योगेश्वर दत्तने ट्विट करत म्हटलं होतं की.. “कुंभमेळ्यात कोणीही बेकायदेशीरपणे प्रवेश करत नाही. लोक प्रोटोकॉलचं पालन करत आहेत. कोणीही तेथील सुरक्षारक्षक किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर थुंकत नाही. कोणीही प्रशासनापासून लपून पळत नाही. त्यामुळे कुंभमधील शांतीप्रिय भक्तांची बदनामी थांबवा’. या आशयाचे ट्विट त्याने केलं. योगेश्वर दत्तने अप्रत्यक्षपणे निजामुद्दीने मकरजसोबत या घटनेची तुलना केली होती.
No one in the Kumbh Mela is reaching there illegally, people are following all protocols, no one is spitting at the security and medical staff, no one is running away after hiding from the administration.
Stop defaming the peaceful devotees at Kumbh. #ThankuTirathJi
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) April 14, 2021
यावर अभिनव बिंद्राने मुळात कुंभमेळ्याचं आयोजन व्हायला हवं होतं का अशी विचारणा योगेश्वर दत्तला केली. ‘मुळात देशात करोना संकट असताना कुंभमेळ्याचं आयोजन करण्याची गरज होती का? करोनाचे विषाणू धर्मांमध्ये भेदभाव करत नाही..’ असं अभिनव बिंद्राने म्हटलं.
No one in the Kumbh Mela is reaching there illegally, people are following all protocols, no one is spitting at the security and medical staff, no one is running away after hiding from the administration.
Stop defaming the peaceful devotees at Kumbh. #ThankuTirathJi
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) April 14, 2021
तसेच अभिनव पुढे म्हणाला कि… ‘तू संपूर्ण क्रिडा क्षेत्राला यामुळे मान खाली घालायला लावत आहे. सध्याच्या घडीला जीव वाचवणे, करोनावर उपाय शोधणे आणि करोनामुळे जीव गमावणाऱ्यांसाठी सहानुभूती दर्शवणं गरजेचं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी मोदींनी स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचे ट्विट करत आवाहन केले.