इंडिगोने सहा महिने तर एअर इंडियाकडून अनिश्चित काळासाठी बंदी
नवी दिल्ली : स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतो. यावेळी त्याने विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनामुळे चर्चेत आला आहे. एका विमानात अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा एकत्र प्रवास करत होते. यावेळी कुणाल कामराने अर्णब यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यासदर्भातील एक व्हिडीओ त्याने ट्विटवर शेअर केला. अवघ्या काही वेळातच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विमान कंपनी इंडिगोनं त्याच्यावर सहा महिन्यांची तर एअर इंडियानं त्याच्या विमान प्रवासावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे.
Hereby, we wish to advise our passengers to refrain from indulging in personal slander whilst onboard, as this can potentially compromise the safety of fellow passengers. 2/2@MoCA_GoI @HardeepSPuri
— IndiGo (@IndiGo6E) January 28, 2020
इंडिगोच्या विमानात कुमाल कामराची वर्तणूक स्वीकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत त्याच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात येत आहे, असे एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी इंडिगोनेही कुमाल कामरावर सहा महिन्यांच्या विमान प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील त्यांचे वर्तणूक पाहता त्यांच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, कंपनीनं ट्वीटरद्वारे दिली. अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तीक टीका करण्यात येऊ नये. यामुळे आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,असे इंडिगोने म्हटले आहे.
#FlyAI: In view of the incident onboard @IndiGo6E, Air India wishes to inform that conduct of Person concerned is unacceptable.With a view to discourage such behavior onboard flts, Mr Kunal Kamra is suspended from flying on any Air India flt until further notice. @HardeepSPuri .
— Air India (@airindiain) January 28, 2020
एखाद्या व्यक्तीला त्रास होईल आणि त्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशी विमानात केलेली वर्तणूक स्वीकारली जाऊ शकत नाही. यामुळे विमातील प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. आमच्याकडे इतर विमान कंपन्यांना संबंधित व्यक्तीवर समान बंधनं घालण्याचा सल्ला देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्पष्ट केलं. त्यांनी ट्वीटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, आज मी लखनौच्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना मी नम्रतेनं बोलण्याची विनंती केली. पहिल्यांदा त्यांनी फोनवर बोलत असल्याचं नाटक केलं. मी त्यांचा फोन संपण्याची वाट पाहिली, असं कुणाल कामरानं आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. हे सर्व मी माझ्या हिरोसाठी केलं आहे. रोहित वेमुल्लासाठी केलं आहे, असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.