माजी न्यायाधिश बी. जी. कोळसे पाटील यांची माहिती
पुणे : एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा जातीय हिंसाचाराच्या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची कोणतीही गरज नाही. याबाबत केंद्र सरकारच्याविरूध्द सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहे, असे या परिषदेचे एक निमंत्रक आणि मुंबई उच्च न्यायलयाचे माजी न्यायाधिश बी. जी कोळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले.
भीमा कोरेगाव प्रकरण आणि एल्गार परिषद यांचा तपास एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णया विरोधात मी आणि आयोजक संस्था उच्च किंचा सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत. राज्यातील मागील भाजपा सरकार उघडे पडू नये, त्या तपासासात झालेल्या गंभीर चुका समोर येऊ नये म्हनून हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
एल्गार परिषदेच्या प्रकरणाचा तपास मागील भाजपा सरकारच्या काळात पोलिसांनी पूर्ण केला. त्या बाबातचे आरोपपत्र न्यायलयात सादर केले. आता तुम्ही हा तपास एनआयएकडे देत आहात असे ते म्हणाले.