कोपरगाव -बंदमुळे शहरात शुकशुकाट निर्माण होवून रस्ते ओस पडले होते. सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. नेहमी वर्दळीचा परिसर असलेला बसस्थानक परिसरात व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेवून खबरदारी घेतली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक जण तर्कवितर्क करताना चर्चा करताना दिसून येत होते. शहरातील काही अध्यात्मिक संस्थांनी कोरोना थोपला जावा म्हणून घरी बसू प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका, अफवा पसरू नका असे आवाहन केले आहे. दरम्यान आज सहकार महर्षी कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे कारखाना तसेच खाजगी कारखाने, उद्योगधंदे, शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांची संख्या कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते.
कोल्हे कारखान्यात खबरदारी म्हणून येणाऱ्या नागरिकांचे सॅनिटायझरने हॅन्ड वॉश करून आत सोडले जात होते. कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी बैठक घेऊन कारखाना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोपरगाव तालुका व्यापारी असोसिएशनने सहकार्य करून दुकाने बंद केली. व्यापाऱ्यांची रात्री बैठक घेण्यात आली होती.
काका कोयटे संस्थापक, व्यापारी महासंघ,