पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक, तर सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्याचा निकाल लागला.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील एकूण 48 हजार 400 शाळांनी नोंदणी केली होती. 3 हजार 725 केंद्रांवर परीक्षा झाली. 5 लाख 74 हजार 581 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील 5 लाख 51 हजार 64 जणांनी परीक्षा दिली. 23 हजार 517 विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यातील 1 लाख 36 हजार 821 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 16 हजार 684 जणांना शिष्यवृत्ती मिळाली. 24.82 टक्के निकाल जाहीर झाला.
आठवीच्या परीक्षेसाठी 25 हजार 335 शाळांनी नोंदणी केली होती. 2 हजार 614 परीक्षा केंद्राची व्यवस्था केली होती. 3 लाख 97 हजार 523 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 3 लाख 81 हजार 787 विद्यार्थी उपस्थित, तर 15 हजार 736 अनुपस्थितीत होते. 57 हजार 567 विद्यार्थी पात्र ठरले. 14 हजार 744 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. 15.07 टक्के निकाल लागला. यंदाही कोल्हापूरने निकालातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
पाचवीचा जिल्हानिहाय टक्केवारीत निकाल
मुुंबई दक्षिण-32.51, मुंबई पश्चिम-28.97, मुंबई दक्षिण-36.51, रायगड-21.15, ठाणे-24.30, पालघर-13.14, मुंबई(बीएमसी)-17.06, पुणे-32.02, अहमदनगर-27.05, सोलापूर-28.98, नाशिक-24.27, धुळे-24.05, जळगाव – 13.36, नंदूरबार-23.44, कोल्हापूर-44.87, सातारा-38.92, सांगली-32.75, रत्नागिरी-43.03, सिंधुदुर्ग-43.77, औरंगाबाद-26.80, जालना-20.78, बीड-20.26, परभणी-14.61, हिंगोली-17.13, अमरावती-17.16, बुलढाणा-34.22, अकोला-13.82, वाशिम-23.72, यवतमाळ-17.02, नागपूर-13.34, भंडारा-9.11, गोंदिया-14.77, वर्धा-12.62, चंद्रपूर-17.43, गडचिरोली-7.94, लातूर-20.69, उस्मानाबाद-22.18, नांदेड-19.02.
आठवीचा जिल्हानिहाय टक्केवारीत निकाल
मुुंबई दक्षिण-28.55, मुंबई पश्चिम-25.23, मुंबई दक्षिण-26.50, रायगड-14.11, ठाणे-20.79, पालघर-9.5, मुंबई(बीएमसी)-6.4, पुणे-24.11, अहमदनगर-18.72, सोलापूर-20.50, नाशिक -12.59, धुळे-16.19, जळगाव -8.4, नंदूरबार-9.5 , कोल्हापूर-32.39 , सातारा-24.26, सांगली-20.24, रत्नागिरी-23.61, सिंधुदुर्ग-25.97, औरंगाबाद-11.84, जालना-10.58, बीड-12.34, परभणी-9.03, हिंगोली-5.92, अमरावती-5.74, बुलढाणा-16.92, अकोला-8.15, वाशिम-10.28, यवतमाळ-6.43, नागपूर-8.15, भंडारा-3.98, गोंदिया-9.34, वर्धा-7.68, चंद्रपूर-6.04, गडचिरोली-4.22, लातूर-12.52, उस्मानाबाद-14.49, नांदेड-11.69.