कोल्हापूर- कोल्हापूर शहरात पून्हा लाॅकडाऊन शक्य नाही आहे, नागरिकांनी स्वत: घरीच थांबावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी नागरिकांना केले आहे. शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. रोज कोरोना बाधितांचा आकडा वाढतो आहे. मात्र शहर बंद ठेवलं तर अनेक व्यवसायांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे घरीच थांबाण्याची विनंती त्यांंनी नागरिकांना केली आहे.
सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या चार जिल्हाचा प्रचंड ताण आहे. या चारही जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी कोल्हापूरात येतात. त्यामुळे कोल्हापूरातील परिस्थीती बिकट होण्याची शक्यता आहे. या चारही जिल्हातील रुग्णांची व्यवस्था त्या त्या जिल्हात व्हावी, त्यासाठी सांगली, सातारा, सिधूदुर्ग आणि रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे विनंती करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्हाने आपल्या जिल्हातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, उपाययोजना राबवाव्या. आपल्या जिल्हातील जबाबदारी आपलाच कशी घेता येईल जेणेकरुन रुग्णांचा प्रवासही टाळू शकू, याकडे लक्ष द्यायला हवे, असेही ते म्हणाले
दरम्यान, कोनोची बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, मुंबईच नाही तर आता कोरोना हा लहान शहरांमध्येही सतत वाढताना दिसतो आहे. याआधी चंद्रपूर शहरात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र केंद्राने त्यासाठी मंजूरी दिली नाही. त्यामुळे आता लाॅकडाऊन करणे शक्य नाही मात्र नागरिकांनी स्वत:च घरी थांबून काळजी घ्यावी.