कोल्हापूर – पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरचा सुपुत्र शहीद झाला आहे. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (रा. आजरा, कोल्हापूर) असे हल्यात शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. ऋषीकेश शहीद झाल्याची घटना समजताच कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.
ऋषीकेश हे 2018 मध्ये सैन्यात भरती झाले होते. ते 6 मराठा बटालीयनमध्ये कार्यरत होते. ऋषीकेश हे राष्ट्रीय खेळाडू होते. सैन्यात भरती होण्याचं त्यांचं लहानपणापासून स्वप्न होतं. ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेने गाव, शहरासह संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऋषीकेश यांचं पार्थिव उद्या रात्री त्यांच्या मुळ गावी आणण्यात येणार आहे.
बिहारमध्ये राजकीय ‘भूकंप’ होणार; संजय राऊत यांचे भाकीत
आज जम्मू काश्मीरमध्ये ऐन दिवाळीत पाकिस्तानकडून शस्त्रंसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान गोळीबार करण्यात आला. यामध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं असून यामध्ये पाकिस्तानचे सात ते आठ सैनिक ठार केले असल्यांचे वृत्त एएऩआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. तसेच या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानचे 3 एसएसजी कमांडोदेखील मारले गेले आहेत. भारताने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे बंकर्स, लॉंच पॅड्स उद्वस्त करत मोठं नुकसान केलं आहे.
बायडेन यांच्या भावी मंत्रिमंडळात ‘डझनभर’ भारतीय वंशीय; महत्वांच्या पदांसाठी झाली निवड
पाकिस्तानने नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत गोळीबाराची सुरूवात केली असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. तसेच या हल्ल्यात 3 स्थानिकांचा मृत्यू तर 6 स्थानिक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.