कोल्हापूर – मध्यरात्रीपासून कोल्हापुर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसाने पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेली असून 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच पावसाने जिल्ह्यात 18 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये जिवीत हानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर ती वित्तहानी झाली आहे.
पंचगंगा, भोगावती नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणं पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधनागरी धरणं 84 टक्के भरलं आहे. गेल्या 24 तासांत गगनबावड्यात सर्वधिक 163 मिमी पावसाची नोंद झाली असून पंचगंगेची पाणी पातळी वाढताना पाहायला मिळत आहे.